शांततेत निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...
💫 कुणाच्या सांगण्यावरुन
आपल्या मनात एखाद्या
व्यक्तीबाबत चांगले वा वाईट
मत बनवण्यापेक्षा, आपण
स्वतः चार पावले चालुन
समोरासमोर त्या व्यक्तीशी
संवाद साधुन मगच खात्री
करा.
💫नाती जपण्यासाठी
संवाद आवश्यक आहे ...
बोलताना शब्दांची उंची
वाढवा आवाजाची उंची
नाही. कारण.. पडणाऱ्या
पावसामुळे शेती पिकते,
विजांच्या कडकडाटामुळे
नाही..आणि
💫 वाहतो तो झरा
असतो आणि थांबतं ते डबकं
असतं..डबक्यावर डास
येतात आणि झऱ्यावर
राजहंस!! निवड आपली आहे.."
💫कुणा वाचून कुणाचे काहीच
आडत नाही हे जरी खरे
असले तरी कोण कधी
उपयोगी पडेल हे सांगता येत
नाही.
💫डोक शांत असेल तर निर्णय
चुकत नाहीत अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
💫अगर ...
एक हारा हुआ इंसान
हारने के बाद भी मुस्करा दे !
तो जितने वाला भी
जीत की खुशी खो देता हैं।
ये है मुस्कान की ताकत ...
💫जपून टाक पाउल ...
इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपून ठेव विश्वास ...
इथे प्रत्येक माणुस आपला
नसतो जपून घे निर्णय .
💫इथे प्रत्येक पर्याय
आपला नसतो जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते
म्हणून नव्हे,तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून...
💫जे तुम्हाला मदत करायला
पुढे सरसावतात ते तुमचे
काही देणे लागतात म्हणून
नव्हे, तर ते तुम्हाला आपलं
मानतात म्हणुन..!
💫मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि... राजहंस मरताना सुद्धा
गातो...
💫दुःखाच्या रात्री झोप
कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही
झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते?
💫आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते...
म्हणुन आनंदी रहा...
💫आयुष्यात कोणत्याही कामाला लहान समजू नका. कारण.. कोणी लोखंडाचं काम करून ' टाटा ' बनला, कोणी चपलांचं काम करून ' बाटा ' बनला !! कोणी टेलिफोन पुसता पुसता ' DSK ' बिल्डर बनला !!
कोणी गाड्या पुसता पुसता 'अंबानी ' बनला !!
तर कोणी चहा विकता विकता
' PM ' बनला...!!!
No comments:
Post a Comment