Saturday, 10 December 2016

मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये – मोर्चाला प्रचंड प्रतिसाद

मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये – मोर्चाला प्रचंड प्रतिसाद

दिवाळीच्या विश्रांतीनंतर परत एकदा मराठवाड्यात मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पहायला मिळाली. यावेळी मोर्चाचे ठिकाण होते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण.
कोपर्डी बलात्कार घटनेतील आरोपींना फाशी यासह मराठा आरक्षण, अट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराला आळा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, इत्यादि. वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन साधारण अडीच ते तीन लाख मराठा समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती. तालुक्याच्या ठिकाणीही इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात यावरुन कडाक्याच्या थंडीच्या मोसमातही मराठा क्रांती मोर्चाची धग अजिबात कमी झाली नसल्याचे दिसुन येते.
maratha-kranti-morcha-paithan-2
मराठा क्रांती मोर्चा पैठण ड्रोन फोटो
मोर्चासाठी कावसानकर स्टेडियम या ठिकाणी सकाळपासुन लोक जमा होत होते. सकाळी ११ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चाच्या पहिल्या फळीत महिला व मुली होत्या. मध्यभागी युवक,पुरुष व शेवटी स्वछता करणारे मराठासेवक होते. मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर मुलींनी मोर्चाच्या मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. यावेळी मुलींनी उत्स्फुर्तपणे मनोगते व्यक्त केली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. आतापर्यंतच्या मोर्चात पहायला मिळालेली शिस्त, शांतता आणि स्वच्छता याही मोर्चात पहायला मिळाली.
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
मराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर
maratha-kranti-morcha-paithan

मराठा आमदारांची नागपूरात गोलमेज परिषद

मराठा आमदारांची नागपूरात गोलमेज परिषद

नागपूर – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपूर येथे दुसरी गोलमेज परिषद झाली. या परिषदेत मराठा समाजातील सर्व पक्षीय आमदारांनी आरक्षणासह इतर मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. या अधिवेशनात सर्व मागण्या प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच सर्वपक्षीय मराठा आमदारांनी मुख्यमंत्र्यानां भेटून आठवडाभरात राज्य मागासवर्ग आयोगवरील नियुक्त्या करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला.
परिषदेत आरक्षणाचे अभ्यासक प्राचार्य एम् एम् तांबे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, व्यंकटेश पाटील, भैया पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांची सविस्तर मांडणी केली. प्राचार्य तांबे यांनी आरक्षणाच्या मुद्दयांवर देशभरातील विविध खटल्यांचे दाखले दिले. तसेच सरकारने कोर्टात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारे पुरावे प्रभावीपणे मांडण्याची गरज विशद केली. त्याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगावरील नेमणूका तात्काळ करण्याची मागणीही यावेळी केली. तर व्यंकटेश पाटील यांनी राणे समितीच्या शिफारशी मराठा आरक्षणाला पोषक असल्याचे सांगितले. तसेच या अहवालातील निष्कर्षनुसार मराठा समाज आरक्षणाला पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी मराठा समाज सर्वात लँडहोल्डर होता. तसेच राजकारण, सहकार या क्षेत्रांत मराठा समाजाने आपले स्थान निर्माण केले होते . मात्र, हा भूतकाळ झाला. सध्या मराठा समाजासमोर अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदींसह विविध क्षेत्रांत हा समाज आता मागे पडला आहे. वर्तमानकाळात मराठा समाज जॉबलेस, लँडलेस आणि पॉवरलेस बनल्याचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. मराठा समाजाती दशा, दिशा आणि आरक्षण या अनुषंगाने पहिली गोलमेज परिषद कोल्हापुरात झाली होती. आता त्यापुढचे पाऊल म्हणजे मराठा आमदारांसाठी दुसरी गोलमेज परिषद आयोजित केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. परिषदेचे आयोजन भैया पाटील यांनी केले.

सिंधुदुर्ग- 23 ऑक्टोबर

सिंधुदुर्ग- 23 ऑक्टोबर
सळसळत्या उत्साहात अभिमानाने मिरवणारे भगवे झेंडे, भगव्या टोप्या , भगवे स्कार्फ आणि निःशब्द वातावरणात ” चालेन तर वाघासारखेच ‘ असे सांगत तमाम मराठ्यांनी आज मराठा क्रांती मोर्चासाठी वाघाची झेप घेतली . गर्दीचे सारे विक्रम मोडीत काढले . लाखोंच्या संख्येने निघालेल्या या विराट मोर्चातून कोपर्डी घटनेच्या विरोधातील चीड व्यक्तच झालीच. मोर्चात तरुणाई आणि महिलांची संख्या लक्षणीय राहिली . त्यांच्या हातातील विविध फलकांनी आपल्या न्याय्य मागण्या मांडतानाही अस्सलच सिंधुदुर्गनगरीचे दर्शन घडवले . सकाळी सातपासूनचच शहराच्या विविध ठिकाणांहून सुरू झालेला हा निःशब्द हुंकार साडेबाराच्या सुमारास महाएल्गारात रूपांतरीत झाला. आणि त्याने कोपर्डी घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई , मराठा आरक्षणासह विविध मागण्यांची एकमुखी मागणी सुरू केली.रणरागिणी ताराराणींच्या वेशभूषेत मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती . मात्र, शोभायात्रेपेक्षा ” हेच आमचे प्रेरणास्थान आहे . आम्ही पेटून उठलोय अन्यायाच्या विरोधात आणि न्याय मिळवूनच मागे हटणार , ‘ असे सांगण्याचाच प्रामाणिक प्रयत्न होता.
डोक्यावर पांढऱ्या , भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, गळ्यात स्कार्फ, साड्या आणि कोपर्डी घटनेची चेहऱ्यावर दिसणारी तिडीक अशा वातावरणात मराठा क्रांती मोर्चातील महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला . शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठमोळ्या माता-भगिनींसह तरुणी लाखोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सिंधुदुर्गाची लोकसंख्या अंदाज साडेआठ लाख, 34%मराठा समाज आहे आजच्या मोर्चात इत्तर समाजाचे लॉक सामिल होत आपला पाठिंबा दिला.
sindhudurg maratha kranti morcha image
शहरातील महिलांपेक्षा ग्रामीण भागातील दैनंदिनी जराच वेगळीच . पहाटे उठायचे . दुभत्या जनावरांची देखभाल , चारा – पाण्याची व्यवस्था करायची , धारा काढायच्या आणि शेताची वाट धरायची . आज या कामांना सुटी देत ऐतिहासिक ” मराठा मोर्चा ‘च्या साक्षीदार होण्यास आतुर झालेल्या महिलांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या वाहनाने शहरात दाखल झाले . पहाटेपासूनच शहराच्या वेशीवर थंडीची तमा न बाळगता दिवसभर लागणारी न्याहरी सोबत घेऊनच त्या वाहनातून उतरल्या. तेथून थेट चालत मोर्चाच्या मार्गावर सहभागी झाल्या .
घराला कुलूप ‘, चूल बंद करून मोर्चात सहभागी व्हा , या संयोजकांच्या व मराठा कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने महिला घराला कुलूप लावूनच मोर्चात उतरल्या. मोर्चात महिला , तरुण अग्रभागी राहिल्या . या महिलांना पुढे जाण्यासाठी वाट करून देण्यापासून ते रस्त्याच्या एका बाजूला त्यांना सहभागी करून घेण्यासाठी स्वयंसेवकांचीही धांदल उडाली.
” ना नेता , ना घोषणा ‘ असे स्वरूप असलेल्या या मोर्चाबाबत ग्रामीण भागातील महिलांत मोठी उत्सुकता होती . राज्याच्या इतर जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचल्याने सिंधुदुर्गच्या मोर्चात कधी सहभागी होतोय , अशाच काहीशा भावना या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या . त्यामुळे ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे महिला सहभागी झाल्या . अनेक महिलांच्या कडेवर लहान मूल, हाताचे बोट धरून चालणारी मुलं – मुली आणि ज्येष्ठ महिलांना सांभाळत निघालेल्या तरुण मुलींनी मोर्चा यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग घेतला आहेङा .
maratha-kranti-morcha-sindhudurg-3
कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी , मराठा समाजाला आरक्षण मिळावे , ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा , शेतीमालाला हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांना च मिळावी या मोर्चाच्या मागण्यांचे महिलांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते . मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना जागोजागी पाणी, खाऊ , फळे वाटप करणारे पाठबळ देत होते.
सकाळी दहापासून सुरू झालेल्या फक्त एक मराठा लाख मराठा दिसू लागला. वैद्यकीय पथक , नाश्ता , चहा पाण्याची सोय आणि स्वयंसेवकांची नम्रता हे येथील ठळक वैशिष्ट्य दिसून येते होते.
रविवारी सकाळपासूनच मोर्चाची वर्दळ सुरू झाली होती . दुचाकी, चारचाकींमधून येणाऱ्या सर्व वाहनांना नियोजनबध्द पार्किंगची सोय केली होती.तसेच वैंद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तैनात होती.कसाल जैतापकर कॉलनी येथे स्वयंसेवकांनी पार्किंगसाठी योगदान दिले . येईल त्याचे आपुलकीने स्वागत करणारे शेकडो स्वयंसेवक ठिकठिकाणच्या मार्गावर थांबून होते.पोलीसांचा वॉच सुरूच होता. सिंधुदुर्गनगरीत येणाऱ्या लोकांना शेकडो स्वयंसेवक नम्रतेने मार्गदर्शन करीत होते.येथील शासकीय मैदानावर पार्किंगचे शिस्तबद्ध नियोजन होते . येणारा प्रत्येक जण शिस्तीचे पालन करीत होता .
चारचाकी , दुचाकी, रुबाबदार बुलेटवर भगवा झेंडा , डोक्यावर भगव्या टोप्या घालून , ग्रामीण भागातील लोक टेम्पो , जीप भरून जथ्याजथ्याने येत होते.साधारण दहाच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी गजबजू लागली होती. अबालवृद्धांचा सहभाग मोर्चात वेगळीच ऊर्जा निर्माण करीत होता . साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास मुख्य चौकात गर्दी वाढली . बघताबघता मुख्य चौक भगवा दिसू लागला. बहुतांशी लोकांच्या हातात भगवे झेंडे होते. ” एक मराठा लाख मराठा ‘ असे लिहिलेले टी शर्ट घालून राबणारे तरुण
स्वयंसेवक सर्वांना नम्रतेने मार्गदर्शन करीत होते शिवाजी चौकात एका बाजूला घातलेल्या व्यासपीठावरील स्पीकरवरून सर्वांना मार्गदर्शक सूचना दिल्या जात होत्या. बघताबघता मोर्चाची वेळ होत होती.आणि एक मराठा लाख मराठा ‘ दिसत होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी. यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे सुरू आहेत.सिंधुदुर्गातील मोर्चा ” न भूतो न भविष्यति ‘ असा असेल, अशी वातावरणनिर्मिती गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू होती . आज प्रत्यक्षात सिंधुदुर्गवासियांना याची अनुभुती आली . ” ना नेता , ना घोषणा ‘ हे राज्यभरातील मोर्चांचे स्वरूप सिंधुदुर्गातही कायम होते . मोर्चात मोर्चाला अनेक समाजाने पाठिंबा देत मोर्चात काहीजण सहभागी झाले होते.

तु मराठा ,मी मराठा

शेवटी मला आवडलेलं एक वाक्य -
"एक मराठा शंभर पाऊल पुढं गेला म्हणजे तो खुप मोठा झाला असं नव्हे,
तर एक मराठा शंभर मराठयांना सोबत घेऊन एक पाऊल पुढं गेला तर तो त्याचा मोठेपणा!"
तुम्ही कोणत्याही पक्ष -संघटनेमध्ये घुसा
पण सदैव मराठयांच्या सेवेत असा,
तु मराठा ,मी मराठा
तरच सगळ्या क्षेत्रात दिसेल मराठाच-मराठा

मुस्लीमांसह / जैन / बौद्ध अल्पसंख्याकांना संरक्षण देणारा अॅट्रोसिटी कायदा संमत

मुस्लीमांसह / जैन / बौद्ध अल्पसंख्याकांना संरक्षण देणारा अॅट्रोसिटी कायदा संमत

नागपूर : राज्यातील मुस्लिमांसह इतर अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष कायदा मंजूर केला आहे. अल्पसंख्याकांना संरक्षण देणारा अॅट्रोसिटी कायद्याला मान्यता देण्यात आली आहे.


या कायद्यातील काही तरतूदींमुळे हिंदुत्त्ववादी संघटनांच्या भुवया उंचवण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक व्यक्तीला घर नाकारलं किंवा नोकरीवर ठेवण्यास नकार दिला, तसंच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला तर दोषी व्यक्तीला सहा महिने ते पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.


राज्यातील अल्पसंख्याकांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर हा कायदा संमत करण्यात आला आहे. यापूर्वी हा कायदा फक्त अनुसूचित जातीतील व्यक्तींसाठी होता. मात्र आता यात अल्पसंख्याकांचाही समावेश करण्यात आला आहे.





अल्पसंख्याक समाज अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१५
६ महिने ते ५ वर्षांचे तुरुंगवास —
१) अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला खाणे योग्य नसलेली वस्तू खाण्यास / पिण्यास बाध्य करणे….
२) त्यांच्या निवासात अपमान करण्याच्या उद्दिष्टाने केर कचरा टाकणे, विष्ठा किंवा पशुचे अंग टाकणे…
३) अंगावरील कपडे फाडणे, धिंड काढणे, जमीन बळकावणे, हक्काच्या जमीन किंवा पाणी साठ्याचा वापर न करू देणे…
४) अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला विशिष्ट व्यक्ती किंवा पक्षाला मतदान करण्यास भाग पाडणे…
५) अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीच्या विरोधात खोटा दावा दाखल करणे, खोटी फौजदारी प्रक्रिया सुरु करणे…
६) अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीविरोधात सरकारी अधिकाऱ्याला खोटी माहिती पुरवून कारवाई करण्यास भाग पाडणे…
७) अल्पसंख्याक समाजातील स्त्रीची अप्रतिष्ठा होईल असे कृत्य करणे…
८) अल्पसंख्याक आहे म्हणून घर भाड्यावर न देणे, नोकरीवर न ठेवणे, शिक्षण संस्थेत प्रवेश न देणे…
९) अल्पसंख्याक समाजातील शिक्षण संस्थेत अल्पसंख्याक नसलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी दडपण आणणे…
१०) गावातील असुरक्षित वातावरणामुळे अल्पसंख्याक व्यक्तीला घर किंवा गाव सोडण्यास बाध्य करणे…

याच कायद्यात बहुसंख्याक समाजातील दोषी व्यक्तीला जन्मठेप आणि मृत्यूदंडाची ही तरतूद आहे…
१) जन्मठेप – अल्पसंख्याक व्यक्तीच्या विरोधात तिला देहदंड होऊ शकेल अशी खोटी तक्रार किंवा साक्ष दिली आणि दिलेली तक्रार किंवा साक्ष खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास खोटी तक्रार किंवा साक्ष देणारऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा होईल…
२) मृत्युदंड – अल्पसंख्याक व्यक्तीला मृत्युदंड झाले आणि त्यासाठी कारणीभूत असलेली तक्रार किंवा साक्ष खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास खोटी तक्रार किंवा साक्ष देणारऱ्या व्यक्तीला मृत्युदंड दिले जाइल….
एवढेच नाही तर अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीच्या मालमत्ता किंवा घरास खोडसाळपणाने आग लावल्यास ७ वर्ष तुरुंगवासाची तरतूद आहे,-.                                                    
👆कृपया शक्य तितक्या गृप वर पोस्ट करून सर्वाना अवगत करा हि विनंती .

288 पैकी आपल्या मराठा समाजाला न्याय मिळण्या साठी लढनारे आमदार यांचे धन्यवाद!

288 पैकी आपल्या मराठा समाजाला न्याय मिळण्या साठी लढनारे आमदार यांचे धन्यवाद!
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
मा प्रशांत भाऊ बंब
 मा आमदार राजेश क्षीरसागर,
 मा आमदार आशिष देशमुख, मा आमदार नितेश राणे
मा आमदार  हर्षवर्धन जाधव
मा आमदार.धनंजय मुंडे
 मा आमदार.शरद रनपिसे
मा आमदार.सुनील तटकरे
 मा आमदार. नारायण राणे
मा आमदार. जयंत पाटिल
मा आमदार.हेमंत टकले
मा आमदार.संजय दत्त
मा आमदार.अमरसिंह पंडित
मा आमदार.भाई जगताप
 मा आमदार.जयंत जाधव
आ.सतीश चव्हाण,
 यांचे मराठा समाजाच्या वतीने खुप खूप आभार आपण जे सामाजा चे ऋण फेडण्या साठी लढताय त्या बद्दल धन्यवाद आपली प्रेरणा सर्वांनी घ्यावी हि अपेक्षा आपला एक मराठा


बाकीचे मराठाच आहे का हे तपासन्यासाठी त्याची DNA Test करण्याची मराठा समाजाची मागणी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

शुभ सकाळ

संयम ठेवा संकटाचे
            हे ही दिवस जातील

      आज जे तुम्हाला
                 पाहून हसतात
      ते उद्या तुमच्याकडे
             पाहतच राहतील😍

🎀🌷शुभ सकाळ 🌷🎀
🎀🌷🌺🌹💞🌹🌺🌷🎀